कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार
पुढील भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार

सांगोला ; विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेत नेहमीच आपले वर्चस्व राहिले होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपण कमी पडलो झालेल्या पराभवाचे शल्य बाजूला ठेऊन आणि झालेल्या चुका टाळून आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यापुढील काळात कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे तोच निर्णय आपण घेऊ असा निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.
रविवार दि. ८ मार्च रोजी सांगोला येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, मधुकर बनसोडे, जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड यशराजे साळुंखे पाटील, डॉ. पियुष साळुंखे पाटील, समीर पाटील आदींसह आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अचानक बैठकीचे नियोजन करूनही या बैठकीला सांगोला शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, गेली ६० हून अधिक वर्षे साळुंखे पाटील कुटुंब हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच सुख आणि दुःखात कार्यकर्त्यांनी आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवला याच विश्वासावर यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आमचे उमेदवार कमी पडले असले तरी, आजही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास हा साळुंखे पाटील परिवारावर आहे. याच विश्वासाच्या बळावर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव बाजूला ठेऊन आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दिपक कांबळे आदी नेते आणि कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करून दीर्घकालीन राजकारण डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घ्यावे अशी भूमिका मांडली
चौकट ;
आजपर्यंतच्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच पक्ष पार्टी जात धर्म न पाहता कुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामे करत गेलो. तरीही, कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही याबाबत आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाची पद्धतीत बदल करू ;
दिपकआबा साळुंखे पाटील



